Home मनोरंजन Indian Idol 12- ‘प्रेक्षकांना रिअलिटी कार्यक्रमांतून मनोरंजनाबरोबरच मसालाही हवा असतो’

Indian Idol 12- ‘प्रेक्षकांना रिअलिटी कार्यक्रमांतून मनोरंजनाबरोबरच मसालाही हवा असतो’

0
Indian Idol 12- ‘प्रेक्षकांना रिअलिटी कार्यक्रमांतून मनोरंजनाबरोबरच मसालाही हवा असतो’

[ad_1]

मुंबई : हा म्युझिकल रिअॅलिटी शो गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भात दररोज नवनवीन खुलासे होत असतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर आणि परीक्षकांवर सोशल मीडियावर टीका होत असते. ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांच्या मुलाने, अमित कुमार यांनी कार्यक्रमात गेल्यावर निर्मात्यांनी यातील स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक आरोप केला होता. त्यामुळे या कार्यक्रमावर जोरदार टीका होऊ लागली. आता गायक याने देखील या कार्यक्रमाच्या संदर्भात आणखी एक मोठा खुलासा केला आहे. त्याने जे काही म्हटले आहे, ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

काय म्हटले जावेद अलीने

गायक जावेद अलीने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘या कार्यक्रमातील स्पर्धक कसे गातात, त्यांचा आवज कसा आहे या सगळ्यापेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये काय चालते हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना जास्त असते. या कार्यक्रमाच्या एका पर्वातील एक गायक खूप छान बोलायचा, त्याच्या बोलण्यामुळे तो त्या पर्वाचा विजेता ठरला होता.’

जावेदने या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, ‘एक गोष्ट मला सांगाविशी वाटते ती म्हणजे लोकांना मनोरंजन आणि मसाला या दोन्ही गोष्टी हव्या असतात. ते स्पर्धकांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी इच्छुक असतात. अलिकडेच एका कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. त्यात मी सुरुवातीला आलेल्या अडचणींबद्दल बोललो होतो.’ जावेद यांनी पुढे सांगितले, ‘तर दुसरीकडे मी देखील एका कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून काम केले होते. दुर्दैवाने यातील जो स्पर्धक विजेता ठरला त्याने आपल्या बोलण्याने सर्वांना भारावून टाकले होते. अर्थात पुढे जाऊन मला असेही वाटते की, कुणाला मत द्यायचे हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. मला नाही वाटत की कुणावरही एखाद्या विशिष्ट स्पर्धकाला मत देण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकते.’


हे ऐकून धक्का बसला

अमित कुमार आणि इंडियन आयडल कार्यक्रमासंदर्भातील वादावर जावेद अलीने सांगितले, ‘हे जेव्हा मी ऐकले तेव्हा मला धक्का बसला. कारण माझ्यासोबत तर असे घडले नव्हते. मी कायमच प्रामाणिकपणे माझे विचार मांडले होते. उलट मला सांगण्यात आले होते की, तुम्ही खोटे विचार मांडू नका कारण लोकांना तुम्ही खोटे बोलत आहात हे लगेचच कळते.’

हे तिघेजण विजेतेपदाचे प्रमुख दावेदार

इंडियन आयडल १२ या स्पर्धेची ट्रॉफी कुणाला मिळणार असा प्रश्न जावेद अलीला जेव्हा विचारला असता तो म्हणाला, ‘ कोणत्याही एका स्पर्धकाचे नाव घेणे कठीण आहे. परंतु माझ्यामते पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल आणि मोहम्मद दानिश हे तिघेजण विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहेत.’

इंडियन आयडल १२ चा ग्रँड फिनाले

दरम्यान, इंडियन आयडल १२ कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले लवकरच होणार आहे. या शेवटच्या स्पर्धेमध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, शनमुखाप्रिया, दानिश मोहम्मद, निहाल तारो, आशिष कुलकर्णी हे स्पर्धक आहेत. यासगळ्यांमध्ये विजेतेपदासाठी मोठी चुरस आहे. कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायणने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की ग्रँड फिनालेसाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत.

[ad_2]

Source link