हायलाइट्स:
- मुंबईत २३ तासांनंतर लोकल सुरू झाली आहे.
- सीएसएमटी ते कसारा/कर्जत लोकलसेवा रात्री ९ वाजल्यापासून पूर्ववत करण्यात आली आहे.
- मुंबई-पुणे हा घाटमार्ग रात्री उशिरापर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न.
सध्या सीएसएमटी ते खोपोली आणि मुंबई-पुणे घाटमार्ग बंद आहे. हा घाटमार्ग रात्री उशिरापर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले.
मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचा बळी गेले. तसेच मुंबई आणि परिसर जलमय झाले. याचा परिणाम मुंबईच्या लोकल वाहतुकीवर झाला. मात्र परवापासून मुंबई आणि ठाणे परिसरात सुरू झालेला मुसळधार पाऊस अधूनमधून कोसळत आहे. मात्र रेल्वे रुळ आणि अनेक रेल्वे स्थानकात तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर तब्बल २३ तासांनंतर सीएसएमटी ते कसारा ही लोकल धावली.