Home ताज्या बातम्या Maharashtra Lockdown Update: राज्यात निर्बंध शिथील होणार का?; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Maharashtra Lockdown Update: राज्यात निर्बंध शिथील होणार का?; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

0
Maharashtra Lockdown Update: राज्यात निर्बंध शिथील होणार का?; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

हायलाइट्स:

  • राज्यात सध्याचे निर्बंध यापुढेही कायम राहणार.
  • तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत सरकारचा निर्णय.
  • लसचे दोन डोस घेतलेल्यांनाच आता राज्यात प्रवेश.

मुंबई: करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला असून राज्यातील रुग्णसंख्याही अद्याप तितकीशी कमी झालेली नाही. त्यामुळेच निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नसून आहेत ते निर्बंध कायम राहणार आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ( Maharashtra Lockdown Restrictions Update )

वाचा: शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार?; संजय राऊत यांनी केले मोठे विधान

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. देशात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. देशाच्या तुलनेत सध्या महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा दर कमी असला तरी पुढील संभाव्य धोका लक्षात घेता आपल्याला सावधपणानेच पुढे जावे लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता कोविड विषयक जे नियम आणि निर्बंध आहेत त्यात कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

वाचा: शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी?

राज्यात करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. लसीकरणाचा वेग चांगला असला तरी तो आणखी वाढवण्यावर आमचा भर आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात राज्याला सव्वाचार कोटी लस मिळणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करता यावा यासाठी आणखी एक हजार डॉक्टर्सची भरती करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात त्याची जाहिरात निघेल, असे त्यांनी सांगितलं.

वाचा: काँग्रेसवर शरसंधान; पटोलेंच्या वक्तव्यांच्या निमित्ताने पवारांचा नेत्यांना संदेश

इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे लसचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे, असे टोपे यांनी सांगितले. यापूर्वी राज्यात प्रवेश देताना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पाहिला जात होता मात्र आता करोनाच्या दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच राज्यात प्रवेश दिला जाईल, असे टोपे म्हणाले. राज्यातील ९२ टक्के रुग्ण दहा जिल्ह्यांमध्ये आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे रुग्ण अधिक आहेत, असेही टोपे यांनी नमूद केले.

अनिल देशमुख यांच्या पत्नीलाही ईडीचे समन्स; वकिलांनी केला ‘हा’ दावा

Source link