Home ताज्या बातम्या Nawab Malik: ठाकरे सरकार किती काळ टिकणार?; आता राष्ट्रवादीनेही स्पष्ट केली भूमिका

Nawab Malik: ठाकरे सरकार किती काळ टिकणार?; आता राष्ट्रवादीनेही स्पष्ट केली भूमिका

0
Nawab Malik: ठाकरे सरकार किती काळ टिकणार?; आता राष्ट्रवादीनेही स्पष्ट केली भूमिका

हायलाइट्स:

  • राज्यातील महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना विश्वास.
  • भाजपचे दावे आणि भविष्यवाणीची उडवली खिल्ली.

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजपकडून दवडली जात नाही. सरकारवर सातत्याने भाजपचे हल्ले सुरू आहेत. त्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बने भाजपला महाविकास आघाडीत मीठाचा खडा टाकण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. या पत्रानंतर सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह लावले जात असताना व शिवसेना भाजपसोबत पॅचअप करेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच हे सरकार भक्कम असल्याचा विश्वास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकसुरात व्यक्त केला आहे. ( Nawab Malik On Maha Vikas Aghadi Government )

वाचा: मुंबई आता लेव्हल १ मध्ये असली तरी…; निर्बंधांबाबत पालिकेने जारी केला आदेश

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं काम उत्तमरित्या सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसची स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी सुरू असली तरी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. पाच वर्षे हे सरकार चालेल, असे काँग्रेसकडूनही सांगण्यात येत आहे. त्या सुरात सूर मिसळत राष्ट्रवादी काँग्रेसनेही सरकारच्या स्थैर्याबाबत कोणतीच शंका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वाचा: भाजप हा कोणालाही त्रास न देणारा गरीब पक्ष: गिरीश बापट

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली व भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप दररोज आपलं सरकार येईल या आशेवर नवनवीन विषय समोर आणून आज सरकार जाणार आहे… उद्या सरकार जाणार आहे, असे बोलत आहे परंतु, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकार जाणार… सरकार लवकरच कोसळणार ही भाजपची भविष्यवाणी एकदाही खरी ठरलेली नाही. त्यांनी सरकार कधी जाणार हे सांगताना तारखा दिल्या पण या तारखा निघून गेल्या तरी सरकार भक्कमपणे काम करत आहे, अशा शब्दांत ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात कुचकामी असल्याचे सांगण्याचा मलिक यांनी प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर बनवण्यात आले आहे. सरकार जनहिताची कामे करतंय आणि सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी आहे. त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.

वाचा: नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव असावे?; राज ठाकरे म्हणाले…

Source link