Home ताज्या बातम्या Phone Tapping: नाना पटोले यांचा फोन टॅपिंगचा आरोप; अजित पवार म्हणाले…

Phone Tapping: नाना पटोले यांचा फोन टॅपिंगचा आरोप; अजित पवार म्हणाले…

0
Phone Tapping: नाना पटोले यांचा फोन टॅपिंगचा आरोप; अजित पवार म्हणाले…

हायलाइट्स:

  • नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात फोन टॅपिंगचा आरोप केला होता.
  • आपण भाजपचे खासदार असताना आपला फोन टॅप झाला होता- पटोलेंचा दावा.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना केलेल्या या आरोपांचे समर्थन केले आहे.


मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात फोन टॅपिंगचा खळबळजनक आरोप केला होता. आपण भाजपचे खासदार असताना आपला फोन टॅप झाला होता, असा दावा पटोले यांनी केला आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना केलेल्या या आरोपांचे समर्थन केले आहे.

नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील नेते आणि लोकप्रतिनिधींचे फोन टॅप केले जात होते. हे फोन टॅप करताना त्यांना खोटी नावे दिली जात होती आणि हाच प्रकार नाना पटोले याच्यासोबत घडला असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे कृत्य हे राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी किंवा मग सार्वजनिक सुरक्षिततेसाठी करण्यात आले तर योग्य आहे असे म्हणता येते, मात्र व्यक्तिगत फायद्यासाठी जेव्हा असे केले जाते तेव्हा ते कृत्य बेकायदेशीर आणि लोकशाहीविरोधी असते, असेही अजित पवार पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’

काय होता पटोलेंचा आरोप?

सन २०१६-१७ मध्ये मी जेव्हा भाजपचा खासदार होतो तेव्हा राज्यात फडणवीस सरकार होते. त्यावेळी एका फेक नावाने एक फोन टॅप करण्यात आला होता, असा दावा नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. पटोले यांनी केलेला हा आरोप म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेले हे टीकास्त्र असल्याचे मानले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा- उस्मानाबाद तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू

नाना पटोले यांचा फोन अमजद नावाच्या एका ड्रग तस्कराच्या नावाने टॅप करण्यात आल्याचे नाना पटोले यांनी सांगितले होते. पटोले यांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली होती. पटोले यांनी केलेल्या या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीचा अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवासाठी विमानानं कोकणात जाता येणार?; विनायक राऊतांनी दिले संकेत

Source link