Home बातम्या आंतरराष्ट्रीय violence in bengal : PM मोदींचा बंगालच्या राज्यपालांना फोन, निवडणूक निकालानंतर हिंसाचार उफाळला

violence in bengal : PM मोदींचा बंगालच्या राज्यपालांना फोन, निवडणूक निकालानंतर हिंसाचार उफाळला

0
violence in bengal : PM मोदींचा बंगालच्या राज्यपालांना फोन, निवडणूक निकालानंतर हिंसाचार उफाळला

[ad_1]

नवी दिल्लीः पश्चिम बंगाल विधानसभा निडणुकीचे निकाल रविवारी लागण्यानंतर राज्यात हिंसाचार उफळला ( violence in bengal ) आहे. जाळपोळ आणि हत्यांच्या घटना घडत आहेत. यात कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. या संबंधी पंतप्रधान मोदींनी फोन आपल्याला फोन केला होता, असं राज्यपाल धनखड यांनी ( pm modi called governor jagdeep dhankhar ) सांगितलं. पंतप्रधान मोदींनी फोन करून पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली, असं धनखड म्हणाले.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी यासंबंधी ट्वीट करून ममता बॅनर्जी यांनी कळवलं आहे. पंतप्रधान मोदींनी फोन केला आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर चिंता आणि नाराजी व्यक्त केली. राज्यात होत असलेली हिंसा, जाळपोळ, लुटमार आणि हत्यांमुळे पंतप्रधान कार्यालयाची चिंता मांडत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था लागू होण्यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत, असं धनखड म्हणाले.

west bengal violence : ‘लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आणि TMC नेत्यांनाही दिल्लीत यावं लागतं’

दरम्यान, पश्चिम बंगालमधील हिसांचाराचं प्रकरणी सुप्रीम कोर्टात गेलं आहे. भाजप नेत्याने याचिका दाखल करत हिंसाचार प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भाजप नेते गौरव भाटिया यांनी ही याचिका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये महिलांवर बलात्कार करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात येत आहेत आणि हत्या केली जात आहे. यामुळे या प्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाटिया यांनी केली आहे.

मजुराची पत्नी ते आमदार… भाजपच्या चंदना बाऊरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महासंचालक आणि कोलकात्याचे आयुक्तांची बैठक बोलावली आहे.

‘ममतांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे हे बंगालमधील हिंसाचारवरून दिसतंय’

दरम्यान, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. हिंसाचारातील पीडित भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना ते भेटत आहेत. ममता बॅनर्जी या लोकशाहीच्या मोठ्या गप्पा मारत असतात. पण तुमच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिंकल्यानंतर हिंसाचार सुरू केला आहे. दुसरीकडे ते हे सर्व खोटं असल्याचं सोशल मीडियातून सांगत आहेत. भाजपच कार्यकर्ता हरण अधिकारी याची पत्नी आणि मुलगा रडत आहेत. माध्यमांनी हे सत्य देशासमोर आणावं, असं जे. प. नड्डा म्हणाले.
uttar pradesh election : यूपीत विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर! पंचायत निवडणुकीत भाजपला झटका

[ad_2]

Source link