Home बातम्या आंतरराष्ट्रीय west bengal election result 2021 : ‘फूट पाडणाऱ्यांना लोकांनी नाकारलं’; विजयानंतर ममतांचे मुफ्तींकडून अभिनंदन!

west bengal election result 2021 : ‘फूट पाडणाऱ्यांना लोकांनी नाकारलं’; विजयानंतर ममतांचे मुफ्तींकडून अभिनंदन!

0
west bengal election result 2021 : ‘फूट पाडणाऱ्यांना लोकांनी नाकारलं’; विजयानंतर ममतांचे मुफ्तींकडून अभिनंदन!

[ad_1]

हायलाइट्स:

  • पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ निकाल
  • ममता बॅनर्जी विजयी, तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागांवर आघाडी
  • ममता बॅनर्जी आणि पक्षावर अभिनंदनाचा वर्षाव
  • मेहबुबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव यांनी केले अभिनंदन

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने विजयी आघाडी घेतल्यानंतर देशातील अनेक नेत्यांनी त्यांचे कौतुक करतानाच, शुभेच्छांचा वर्षाव केला. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनीही ममतांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्या पक्षांना पश्चिम बंगालमधील नागरिकांनी नाकारलं आहे, अशी प्रतिक्रिया देतानाच, भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत येणार आहे, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. आतापर्यंतचे कल बघता तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी देखील नंदीग्राममधून विजयी झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी त्यानंतर ट्वीट करून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉंग्रेसचे आज मिळालेल्या जबरदस्त विजयाबद्दल अभिनंदन. पश्चिम बंगालच्या लोकांनी फूट पाडणाऱ्या आणि विभाजनवादी पक्षांना नाकारले. त्यासाठी येथील लोक कौतुकास पात्र आहेत,’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

West Bengal Poll: बंगालमध्ये मोदी-शहांच्या स्वप्नांना सुरुंग; या ४ कारणांमुळे झाला भाजपचा पराभव

अरविंद केजरीवाल यांनीही केले अभिनंदन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस सत्तेत राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले आहे. विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. जबरदस्त विजयासाठी ममताजींचे अभिनंदन. काय जबरदस्त सामना! पश्चिम बंगालच्या लोकांचेही अभिनंदन!, असे केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

तेजस्वी यादव काय म्हणाले ?

आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. पश्चिम बंगालच्या ममतामयी जनतेचे कोटी कोटी अभिनंदन. आज संपर्ण देश कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालने पुन्हा एकदा आपली ममता आणि विश्वास आपल्या दीदींवर दाखवला आहे. हा जनतेचा स्नेह आणि विश्वासाचा विजय आहे. ममता बॅनर्जी यांच्या दृढ आणि कुशल नेतृत्वाचा हा विजय आहे, असे तेजस्वी म्हणाले.

[ad_2]

Source link