Home क्रीडा धोनीवरून पुन्हा एकदा भारत-पाक चाहते आमने-सामने

धोनीवरून पुन्हा एकदा भारत-पाक चाहते आमने-सामने

नवी दिल्ली : फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीनंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत विश्‍वचषक स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. दरम्यान भारताकडून रोहित शर्माने केलेली 102 धावांची शतकी खेळी या पराभवाने व्यर्थ ठरली. तर, भारताच्या पराभवाने पाकिस्तानचे विश्‍वचषकातील आव्हान डळमळीत झाले आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर भारतासह पाकिस्तानचे विशेष लक्ष होते. हा सामान भारताने जिंकला असता तर पॉईंट टेबलमध्ये इंग्लंडचा मार्ग खडतर झाला असता आणि पाकिस्तानच्या आशा वाढण्याच्या शक्यता होत्या. परंतु, इंग्लंडने सामना जिंकल्याने पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहते भारतीय संघ आणि महेंद्रसिंह धोनीवर चांगलेच भडकले आहेत. भारत आणि इंग्लडचा सामना फिक्स घोषित करावा अशी मागणी पाक चाहत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे भारतीय चाहते धोनीचे समर्थन करत आहेत.