Home मनोरंजन नॉनस्टॉप मनोरंजनाची ही खरी एक्स्प्रेस! ‘तारक मेहता का..’ मालिकेचे ३२०० भाग पूर्ण!

नॉनस्टॉप मनोरंजनाची ही खरी एक्स्प्रेस! ‘तारक मेहता का..’ मालिकेचे ३२०० भाग पूर्ण!

0
नॉनस्टॉप मनोरंजनाची ही खरी एक्स्प्रेस! ‘तारक मेहता का..’ मालिकेचे ३२०० भाग पूर्ण!

[ad_1]

हायलाइट्स:

  • १३ वर्षांपासून सुरू आहे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका
  • तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे ३ हजार २०० भाग पूर्ण
  • प्रेक्षकांचा सर्वाधिक आवडता कार्यक्रम

मुंबई : छोट्या पडद्यावर अनेक विनोदी मालिका येतात आणि जातात. परंतु एक कार्यक्रम मात्र गेल्या १३ वर्षांपासून अव्याहतपणे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग हा मनोरंजक असतो. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांकडूनही या कार्यक्रमाला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत असल्यानेच या मालिकेने ३ हजार २०० भागांचा टप्पा ओलांडत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. छोट्या पडद्यावर असा इतिहास घडवणारा कार्यक्रम म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा…’ या मालिकेने छोट्या पडद्याच्या विश्वामध्ये केलेल्या विक्रमामुळे चहूबाजूंनी कलाकारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

काय म्हणाले असित मोदी

या मालिकेचे निर्माते असीत मोदी यांनी प्रेक्षकांनी केलेल्या भरभरून प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, ‘करोनामुळे काही दिवस कार्यक्रमाच्या चित्रीकरणात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी अनेक चढ- उतार अनुभवास आले. परंतु आमच्या सर्व कलाकारांनी आणि क्रू मेंबर्संनी मेहनत घेऊन काम पूर्ण केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आम्ही हा विक्रम करू शकलो आहोत. यासाठी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला आहे. त्यांच्याकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आणि ते करत असलेल्या सूचनांमुळेच हे सारे शक्य झाले आहे.’


चाहत्याने दिली अनोखी भेट

या मालिकेने नवीन विक्रम रचल्याचे औचित्य साधत एका चाहत्याने सर्व कलाकारांना अनोखी भेट दिली आहे. एका चाहत्याने बाटलीच्या आतमध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील सर्व कलाकारांचे चित्र काढले आहे. त्याचप्रमाणे या चाहत्याने असित मोदी यांना गणपतीची आणि हनुमानाचे हाताने काढलेले चित्र भेट म्हणून दिले आहे. या कार्यक्रमातून भारतीय समाजाचे प्रतिबिंब उमटते. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटी म्हणजे मिनी भारतच आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने असल्याने भरभरून प्रेम सर्व कलाकारांना मिळत असते.


१३ वर्षात ३२०० भाग!

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचा पहिला भाग २८ जुलै २००८ ला प्रसारित झाला होता. हा कार्यक्रम सब टीव्हीवर प्रसारित केला जात असून त्याचे आतापर्यंत ३ हजार २०० भाग पूर्ण झाले आहेत. कार्यक्रमातील कलाकार सातत्याने बदलत गेले असले तरी कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही फरक पडलेला नाही.



[ad_2]

Source link