Home ताज्या बातम्या माऊंट कांचनजूंगाची यशस्वी चढाई

माऊंट कांचनजूंगाची यशस्वी चढाई

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गिर्यारोहकांचे अभिनंदन

मुंबई : भारतातील सर्वोच्च माऊंट कांचनजूंगा शिखर सर केलेल्या पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.

या यशस्वी चढाईत जगात पहिल्यांदा दहा जणांच्या चमुने एकत्रित एकाच दिवशी हे शिखर सर करण्याचा विश्वविक्रम नोंदविल्याची माहिती गिरीप्रेमीचे प्रमुख उमेश झिरपे यांनी दिली. गिरीप्रेमीच्या या चमुत आनंद माळी,भूषण हर्षे, रूपेश खोपडे, किरण साळस्तेकर, सुमित मांदळे, जितेंद्र गवारे, विवेक शिवदे, कृष्णा ढोकले, प्रल्हाद जोशी, आशिष माने यांचा समावेश आहे.

या चमुने प्रत्यक्ष ४५ दिवसांच्या चढाईत १५ मे २०१९ रोजी कांचनजुंगाचे हे ८ हजार ५८६ मिटर्स उंचीचे शिखर सर केले आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या चमुचे या यशस्वी चढाईसाठी कौतुक करून पुढील मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या.