परवेज शेख आमचे गटनेते एकनाथ शिंदे साहेब यांना राज्यपाल साहेबांकडून पत्र मिळालं आणि आम्हाला विचारलं गेलं की तुमची इच्छा आहे का सरकार बनविण्याची.
अर्थात आमची वेळ ही ७:३० पर्यंत असल्यामुळे आम्ही ६:४५ वाजता इथे पोचलो आणि राज्यपाल साहेबांना सांगितले की आमची इच्छा आहे सरकार स्थापन करण्यासाठी.
आम्ही राज्यपाल महोदयांकडे वेळ मागितला होता, त्यांनी तो आता आम्हाला नाकारला आहे पण आमचा दावा त्यांनी नाकारलेला नाही आहे, वेळ नाकारलेली आहे.
राज्याला स्थिर सरकार देणे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडू.” -युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे