Home मनोरंजन ‘ही तर बेसुऱ्यांची फौजच!’ सोनू कक्कडनं नुसरत फतेह अलींचं गाणं गायल्यावर युझर्सनं दिली प्रतिक्रिया

‘ही तर बेसुऱ्यांची फौजच!’ सोनू कक्कडनं नुसरत फतेह अलींचं गाणं गायल्यावर युझर्सनं दिली प्रतिक्रिया

0
‘ही तर बेसुऱ्यांची फौजच!’ सोनू कक्कडनं नुसरत फतेह अलींचं गाणं गायल्यावर युझर्सनं दिली प्रतिक्रिया

[ad_1]

मुंबई : इंडियन आयडल १२‘ कार्यक्रम विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे. या स्पर्धेतील काही स्पर्धकांनी त्यांच्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्यामुळे त्यांच्यावर लोकांनी कडाडून टीका केली होती. त्यामुळे इंडियन आयडलच्या १२ वे पर्व हे वाद विवादांमध्येच अडकले आहे.

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या कार्यक्रमावरून प्रेक्षकांच्या मनात कार्यक्रमाबद्दल शंकाकुशंका निर्माण झाल्या आहेत. सर्वात जास्त प्रश्न कार्यक्रमातील परीक्षकांवरून उठले आहेत. सध्या अनु मलिक आणि मनोज मुंतशीर परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. पण नेमकी याच गोष्टीमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण कार्यक्रमामध्ये कधी मनोज दिसतात तर कधी अनु मलिक असतात. आता तर कार्यक्रमाच्या नवीन प्रोमेमध्ये सोनू कक्कड आणि शब्बीर कुमार परीक्षक म्हणून दिसले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी कार्यक्रमाला सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केली आहे.


इंडियन आयडल पुन्हा एकदा ट्रोल

इंडियन आयडल १२ कार्यक्रमाचा अलिकडेच एक प्रोमो प्रसारित झाला. त्यामध्ये सवाई भटने गाणे गायले आहे. ते गाणे ऐकून त्याला सोशल मीडियावर युझर्सने ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काहींनी तर असेही म्हटले आहे की, बघा ही तर बेसुऱ्या लोकांची फौजच झाली आहे. या आठवड्यामध्ये इंडियन आयडल कार्यक्रमाचा जो भाग प्रसारित होणार आहे, त्यामध्ये स्पर्धक प्रेक्षकांनी शिफारस केलेली गाणी गाणार आहेत.

या कार्यक्रमाच्या प्रोमोत सवाई भटने ‘तेरी दिवानी’ हे गाणे गाताना दिसत आहे. त्यानंतर सवाईने सोनू कक्कड बरोबर गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सोनूने आणि सवाईने नुसरत फतेह अली खान यांचे ‘मेरे रश्के कमर’ हे गाणे गायला सुरुवात केली. त्यावरून या दोघांनाही सोशल मीडियावर युझर्सने ट्रोल करायला सुरुवात केली.


लोकांनी या दोघांना विशेष करून सोनू कक्कडला आणि निर्मात्यांना ट्रोल केले आहे. काही युझर्सने तर लिहिले की, ‘जगातील सर्वात बकवास कार्यक्रम आहे. संपूर्ण कार्यक्रमातच गडबड असून सगळ्यांचं एकमेकांशी साटंलोटं आहे.’ एका युझरने तर लिहिले की, ‘कृपया अरुणिता आणि पवनदीपला कार्यक्रमात परत आणा’ आणखी एका युझरने लिहिले की, ‘या दोघांनी गायलेले मेरे रश्के कमर हे गाणे ऐकल्यानंतर मूळ गाण्याची त्यांनी वाट लावली आहे.’

AssignmentImage-1063463689-1623480146

दरम्यान, याआधी कार्यक्रमातून अंजली गायकवाडला नॉमिनेट केल्यामुळे कार्यक्रमावर टीका झाली होती. अनेकांनी त्याला आक्षेप घेतला होता. अंजली ऐवजी शनमुखा प्रियाला का काढले नाही, असा सवालही विचारण्यात आला. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनी नाही तर काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी देखील अंजिला गायकवाडच्या नॉमिनेशवर आक्षेप घेतला. त्यांनी याबाबत एक ट्वीट करताना लिहिले, ‘काही तास या कार्यक्रमामुळे सांगितीक विश्वाची सफर आम्ही करतो. त्यामुळे कोणाचेही एलिमिनेश करू नका. अंजली गायकवाडला परत आणा.’



[ad_2]

Source link