Home शहरे बीड “तिर्थक्षेत्र परळी येथील पत्रकारांना मिळणार हाक्काचे घर धनंजय मुंडे कडुन दिड एक्कर जागा भेट”

“तिर्थक्षेत्र परळी येथील पत्रकारांना मिळणार हाक्काचे घर धनंजय मुंडे कडुन दिड एक्कर जागा भेट”

0

माजलगाव प्रतीनीधी : गेल्या दहा वर्षांत परळी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व करणाऱ्या विद्यमान पालकमंत्री यांच्या नेतृत्वाचा नेमका मतदार संघासाठी कोणता फायदा। झाला ? रोजगार, शेती, उद्योग यासह सामान्य माणसाचे अर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सत्तेचा किती फायदा करुन दिला ? याचा विचार केला गेला पाहिजे.याउलट आमच्या ताब्यात असलेल्या संस्था आणि राज्यस्तरावर काम करताना इथली माती व या मातीतल्या माणसाशी निष्ठा, इमान ठेवत काम करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. या वास्तवाचे चित्रण प्रसारमाध्यमांनी केले पाहिजे.तसेच परळी मतदारसंघातील विकासाच्या वास्तवाचे विश्लेषण पत्रकारांकडून अपेक्षित असल्याचे प्रतिपादन ना. धनंजय मुंडे यांनी केले.

परळी वैजनाथ शहरातील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेस विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील नगर पालिकेने दीड एक्कर जागा दिली असुन त्याचे हस्तांतरण व नामफलकाचे अनावरण आज करण्यात आले. तालुका ठिकाणच्या पत्रकारांच्या घरासाठी जागा देणारी परळी नगर परिषद ही राज्यातील एकमेव व परळी हे पहिले शहर ठरले आहे.परळी तालुका व शहर पत्रकार संघासाठी परळी नगर पालिकेने मंजूर केलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या जागेचा हस्तांतरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विधान परिषद विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्यासह नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे, सौ.राजश्री धनंजय मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नगरसेवक चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण , उपनगराध्यक्ष अय्युब पठाण, शिक्षण सभापती संजय फड, प्रा. डाॅ. विनोद जगतकर, दत्ता पाटील, रणजित लोमटे आदी मान्यवर उपस्थित होते.

परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या गृहनिर्माण संस्थेसाठी विरोधीपक्ष नेते ना. धनंजय मुंडे यांनी परळी न.प.च्या माध्यमातून शहरातील नंदागौळ रोडवर जागा उपलब्ध करुन दिली आहे. तालुक्याच्या ठिकाणी नगर पालिकेच्या माध्यमातून पत्रकारांच्या गृहनिर्माणसाठी जागा देणारी परळी नगर परिषद पहिली ठरली आहे.

यावेळी पुढे बोलताना ना. धनंजय मुंडे यांनी सांगितले की, परळीचे लोकप्रतिनिधी राजकीय द्वेषापोटी राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थांच्या विकासात आडकाठी आणतात. सुडाचे हे राजकारण आपण कधीच केले नाही, आणि करणार नाही.इथल्या मातीशी इमान व या मातीतल्या माणसाच्या सर्वांगीण उन्नतीचे ध्येय उराशी बाळगून आपण काम करत आहोत. आपली कोणाशीही लढाई नाही किंवा राजकारण काही मिळावे यासाठी नाही. इमानेइतबारे राबत असताना परळीची जनता म्हणुन पाठीशी उभे रहावे, एवढी अपेक्षा व्यक्त करताना या मातीतील माणुस आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, त्याचे दरडोई उत्पन्न दुप्पट व्हावे हे आपले स्वप्न असून, संधी मिळाल्यास ते करून दाखवण्याची धमक आहे, त्यासाठी आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार लक्ष्मण वाकडे यांनी केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार संपादक बालासाहेब कडबाने, पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष मोहन व्हावळे, सचिव गोपाळ आंधळे, सौ.सुमनताई वाकडे, सौ.अनिता कडबाने,सौ.शुभांगी आंधळे,रामप्रसाद शर्मा,धनंजय आढाव, संपादक राजेश साबणे, संजय खाकरे, प्रा. रविंद्र जोशी,ओमप्रकाश बुरांडे,धीरज जंगले आदींनी केला. सुत्रसंचलन प्रशांत प्र. जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत गित्ते यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पत्रकार, पत्रकार कुटुंबिय, कार्यकर्ते उपस्थित होते.