Home ताज्या बातम्या bjp make demand of financial pkg: पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडे भाजपने केली ‘ही’ मोठी मागणी

bjp make demand of financial pkg: पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडे भाजपने केली ‘ही’ मोठी मागणी

0
bjp make demand of financial pkg: पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडे भाजपने केली ‘ही’ मोठी मागणी

हायलाइट्स:

  • पंतप्रधान मोदी यांनी सर्वांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा केल्याने आता राज्या सरकारचे ७ हजार कोटी रुपये वाचले असून आता सरकारने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
  • राज्य सरकारने गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयाचे चालक, तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता हे पॅकेज तातडीने वितरीत करावे – भाजप.
  • गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडेल्या जनतेला या पॅकेजमुळे दिलासा मिळेल असे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. या दरम्यान भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे गोरगरीब जनतेसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्वांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा केल्याने आता राज्या सरकारचे ७ हजार कोटी रुपये वाचले असून आता सरकारने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपने केली आहे. (bjp has demanded cm uddhav thackeray to announce financial package for needy citizens)

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ कोटी लशी एकरकमी चेक देऊन खरेदी करायला आपण तयार असल्याचे फेसबुकलाइव्हच्या माध्यमातून सांगितले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यानीच सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे १२ कोटी लस खरेदी करण्यासाठी लागणारे ७ हजार कोटी रुपये वाचले आहे. आता या रकमेतून गोरगरीबांसाठी पॅकेज जाहीर करावे अशी मागणी उपाध्ये यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- कोरोनामुक्त गावासाठी आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘हे’ आवाहन

हे पॅकेज कोणाकोणासाठी जाहीर केले जावे याचा तपशील उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये दिला आहे. लशी विकत घेण्याच्या वाचलेल्या रकमेतून राज्य सरकारने गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयाचे चालक, तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता हे पॅकेज तातडीने वितरीत करावे असे आवाहन उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना आहे.

क्लिक करा आणि वाचा- सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर मोदी सरकारला आली जाग: बाळासाहेब थोरात

गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडेल्या जनतेला या पॅकेजमुळे दिलासा मिळेल असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- पुणे आग: मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देणार; अजित पवार यांची घोषणा

Source link