मुंबई, दि. १५ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना ‘विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत’ घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शासकीय दवाखान्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी संजय पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, उपजिल्हाधिकारी (अति./निष्का.) प्रशांत पानवेकर, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000









WhatsApp